प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज आरे बापरे…पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे
पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील २२ वर्षीय तरुणीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात खुन अत्याचार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक
कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र प्रल्हाद गायकवाड (वय ५०, रा. माळशिरस, ता. पुरंदर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिकेत विष्णु जाधव (वय २१, रा. माळशिरस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. हा गुन्हा सासवड पोलीस स्टेशन मध्ये खुणाचा व
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, मृत तरुणी निलम गायकवाड (वय २२) ही सासवड येथील महाविद्यालयात टी.वाय.बी.ए.चे शिक्षण घेत होती. सुमारे तीन वर्षांपूर्वी तिचे आरोपी अनिकेत जाधव याच्याशी फोनवरून बोलणे होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी दोन्ही
कुटुंबांमध्ये चर्चा होऊन संपर्क तोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
दि. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी निलम ही नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. मात्र सायंकाळी घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. रात्री उशिरा पोलिसांकडून फोन
आल्यानंतर कुटुंबीय ग्रामीण रुग्णालय, सासवड येथे
पोहोचले असता निलमचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे समजले.
मृतदेह पाहिल्यानंतर तिच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा, गळा सुजलेला असल्याचे दिसून आले. फिर्यादीने
दिलेल्या तक्रारीत आरोपीने अत्याचार करून गळा दाबून खून केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना दि. १ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजण्यापूर्वी खानवडी गावाच्या हद्दीत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आरोपीच्या कुटुंबीयांकडून धमकीची शक्यता असल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















