प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: सासवड, दि. 20 जून 2026 : रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात सासवड पोलिसांनी
धडक मोहीम सुरू केली असून, भररस्त्यात वाहने उभी करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाहतूक शिस्तीबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे
सासवड शहर आणि परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान कोंढवा-सासवड रोडवरील हॉटेल मोहीनी समोर आणि सासवड-बोपदेवघाट रोडवरील भोगळे वाईन्स समोर दोन चारचाकी वाहने धोकादायक
पद्धतीने उभी केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे
या प्रकरणी मयुर संदाम कुंभारकर आणि जयदीप बाळकृष्ण निगडे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं.का. कलम 285 अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस हवालदार संतोष गोरख शिंदे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे
विशेष म्हणजे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता थेट गुन्हे दाखल करण्याची भूमिका सासवड पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.
“रस्ते हे सर्वांसाठी आहेत, काहींच्या मनमानीसाठी नाहीत,” असा संदेश या कारवाईतून दिला जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे पुरंदर तालुक्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेचे
अनेक स्तरांतून स्वागत केले जात असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत
सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अतिशय सकारात्मक बदल दिसून येत आहे.सासवड मधील ट्रॅफिकचे समस्या,सासवड आणि परिसरातील अवैध व्यवसाय,तसेच बेशिस्त दुचाकी व चार चाकी नागरिकांना समज देणे असेल तसेच इतरही नागरिकांच्या विविध
समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने ते अग्रक्रमाने प्रयत्नशील आहेत. आणि हे अतिशय कौतुकास्पद आहे.त्यामुळे अशा प्रामाणिक,कडक शिस्तीच्या व गुन्हेगारांना कायद्याचा धाक
निर्माण करून सर्वसामान्यांच्या हिताचे संरक्षण करणाऱ्या
अधिकाऱ्याला नागरिकांनी सपोर्ट करणे गरजेचे आहे.असे पुरंदर मधील दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार
शिवदास शितोळे यांनी द महाराष्ट्र न्यूज सी बोलताना सांगितले.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















