प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात ३ वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर
काही जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी
ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
या अपघातातील मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमी वारकऱ्यांवर शासकीय खर्चाने संपूर्ण मोफत
उपचार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले
आहेत. शासन अपघातग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे
असून उपचारात कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















