प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज: शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ म्हणजे रस्त्यावर वाहतूक कोंडी ही ठरलेली. मात्र ही कोंडी अनेकांच्या अंगवळणी पडल्याने या बेशिस्त
वाहन चालकांवर प्रशासन कारवाई करण्यावर तयार होत नाही परिसरांत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असल्याने यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कोंडीतून वाट काढताना सायकलवरून अथवा चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे
वाहतूक कोंडीमुळे प्रवासास वेळ लागून वादावादीचे प्रकार वाढत आहे. त्याचबरोबर इंधन मोठ्या प्रमाणावर जळून ध्वनी वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. या कोडींचा
परिसरातील नागरिक व्यावसायिकांना त्रास होत असल्याने यावर उपाययोजना राबविण्यासाठी स्थानिक प्रशासन पोलिस यंत्रणा, शाळा व्यवस्थापन समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे
या शाळांमध्ये परिसरातील हजारो विद्यार्थी येत असतात. त्यांना सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी येणारे पालक त्यांची वाहने रिक्षा, स्कूलबसची यामुळे शालेय
कामकाजाच्या दिवशी सर्वच शाळा परिसरात वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा त्रास समाजातील सर्वच घटकांना दररोज सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी वाहतूक आराखडा तयार करणे आवश्यक आहे
वाघीरे महाविद्यालयांमध्ये शहरासह पुरंदर तालुक्यातील हजारो विद्यार्थी येत असतात. मुलांना शाळेत
वेळेत सोडण्यासाठी आणि तिथून पुन्हा घरी नेण्यासाठी पालकांची तसेच त्यासाठी कार्यरत असणाऱ्या इतर खासगी
यंत्रणांची मोठी तारांबळ यामुळे उडत असते. या तारांबळीतूनच वाहने अस्ताव्यस्त लावण्याचे प्रकार होऊन त्याची परिणीती वाहतूक कोंडीत होते सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम ह्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करणार का? याकडे पालकांचे लक्ष लागून आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















