प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरूद्ध बंड पुकारत आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण
करणारे पुरंदरचे सुपुत्र आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक
यांचे जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक मंत्री २३४ व्या सोहळ्यास उपस्थित राहून दिवे येथील ५ एकर जागेत भव्य
राष्ट्रीय स्मारकाची घोषणा करण्यात येईल असे आद्य क्रांतीवीर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले
सासवड (ता पुरंदर) येथील शासकीय विश्रामगृहामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले आमच्या समाजाला दरोडेखोर म्हणून घोषित
करण्यात आल्याने शिवाजी राजे काळापासून बहिर्जी नाईक यांचे सारखे ४० महापुरुष देशासाठी हुतात्मे झाले.या समाजाच्या सर्व मागण्या देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केल्या आहेत.ते दरवर्षी भिवडी
येथे उपस्थित राहतात.नुकतीच शासनाने
दिवे पुरंदर येथील गायरान ५ एकरजमीन राष्ट्रीय स्मारकास देवू केली असून याचे ५० कोटी रुपये खर्चास व त्यांचे नावाने
आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले
आहे.व अनेक महापुरुषांची नावे राज्यात
अनेक ओद्योगिक शिक्षण संस्थांना देवून त्यांचे नावाचे शासनाने पुरस्कार घोषित करण्यात येत असून शासकीय जयंती साजरी करताना दरवर्षी ५० लाख रु.खर्च
शासन करत आहे
सध्या राज्यात जातीय आरक्षणाचे लाभ
मिळवण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आमचे आरक्षण हे शासन दरबारी प्रलंबि त असून धनगर – धनगड व बेरड – बेडर
या शब्दांमध्ये अडकले आहे.त्यामुळे हे आज ना उद्या मिळणारच आहे.आमचा मुख्यमंत्री व शासनावर पूर्ण विश्वास आहे
असे शितोळे यांनी सांगितले यावेळी
राजे उमाजी नाईक यांचे वंशज चंद्रकांत भाऊ खोमणे जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष अंकुश जाधव गाणपत शितकल, गंगाराम जाधव, यशवंत (बिट्ट ) भांडवलकर, लालासाहेब
भंडलकर, विकास भांडवलकर, अशोक चव्हाण, साहेबराव जाधव, अमोल चव्हाण, अविनाश जाधव, नीलेश जाधव, समीर भांडवलकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















